कागदपत्रे नोटरी करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना?

मित्रांनो आपण कागदपत्रे नोटरी करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना?
नोटरीची नियुक्ती ही सरकार करते जेणे करून नागरिकांना लहान सहान करार करणे साठी, साक्षांकित प्रती करणे साठी सोईस्कर होईल. नागरिकांचा तसेच सरकारी नोंदणी अधिकारी यांचा वेळ वाचेल.

नोटरी कायदा 1952 आणि नोटरी नियम 1956 मधील कलम / नियम विचारात घेऊन दस्तऐवज साक्षांकित करणे, नियम 10 नुसार फी आकारणे हे अपेक्षित आहे. परंतु काही नोटरी हे अवाजवी फी आकारात आसतात त्यामुळे शासनाने परिपत्रके काढून फी निश्चित केलेली आहे. सदर बाबत आपण खालील लिंक द्वारे दर पाहू शकता, विविध नोटरी संबंधित परिपत्रके पाहू शकता.

https://lj.maharashtra.gov.in/1253/Notary-Circulars

नोटरी अधिनियम १९५२ मधील कलम ३ नुसार व नोटरी नियम १९५६ नुसार नोटरीची नियुक्ती करण्यात येते.
 
नोटरीच्या नियुक्तीसाठी वकीली व्यवसायाचा १० वर्षांचा अनुभव लागतो. (महिला, मागासवर्गीय  व इतर  मागासवर्गीय साठी किमान ७ वर्षांचा अनुभव लागतो) नोटरीची एकदा नियुक्ती झाल्यावर दर ५ वर्षांनी नोटरीना मुदतवाढ देण्यात येते त्यासाठी नोटरी ने दर पाच वर्षांनी आपले सर्टिफिकेट रेन्यू केले पाहिजे. 

नोटरीची नियुक्ती झाल्या नंतर शासन त्यांना कोणतेही मानधन देत नाही. परंतु ते शासनाने निश्चित केलेली फी नागरिकांकडून घेऊ शकतात.

सामान्य जनतेला एखाद्या नोटरीच्या विरुध्द कारवाई/तक्रार करायची असल्यास नोटरी अधीनियम 1956 मधील नियम 13 नुसार सक्षम प्राधीकारी यांच्याकडे रीतसर तक्रार  करु शकता. 

नोटरी विरुध्द कारवाई  करावयाचे आधीकार सहसचिव तथा सक्षम प्राधीकारी, विधी आणि न्याय विभाग, रूम नंबर 304 (मुख्य), 3 रा मजला, राजगुरू हुतात्मा चौक, मादाम कामा रोड,  मांत्रालय, मुंबई– 32. दूरध्वनी क्रमाांक.(022) 22028619 यांना आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडे रीतसर तक्रार करू शकता.

नोटरी फी ही खालील प्रमाणे अकारावी असे परिपत्रक क्रमांक  विवन्यावि-2012/नोटरी/ई-शाखा दिनांक १३/०४/२०१२ नुसार निश्चित केले आहे.

१) रुपये १०००० पर्यंतचा करार नोंदवायचे (नोटरी करणेसाठी) साठी रुपये ३५.
२) दहा हजार ते २५००० साठी रुपये ७५/-
३) २५००० ते ५०००० साठी रुपये १००/-
४) ५०००० चे पुढे जास्तीत जास्त रुपये १५०/-
५) साक्षांकित प्रती साठी रुपये ५/- प्रती पान (कमीतकमी रुपये १०/-)

वरील लिंकने आपण सर्व शुल्काबाबत माहिती घेऊ शकता.

वरील प्रमाणे रुपये ३५/- ते रुपये १५०/- म्हणजेच जास्तीत जास्त रुपये १५०/- एवढाच आकार नोटरी घेऊ शकतात.

कित्येक नोटरी हे काही हाई कोर्टात, सुप्रीम कोर्टात दाखल करायचे कागद पत्रे, काही करारनामे यांच्या साठी वरील पेक्षा खूप जास्त फी मागतात आणि नागरिकांना याची माहिती नसते त्यामुळे तेही मुकाट्याने देतात.

आपणास हे माहिती आहे का? 

नोटरी ने अकारलेल्या फिची पावती द्यावी असेही शासनाने बंधन नोटरी वर घातले आहे.

१) दिनांक 28 मे 1993 नोटरींनी केलेल्या व्यावसायिक गैरवर्तणुकीबाबतचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

२) दिनांक 18 डिसेंबर 2001 नोटरी काम करतांना नोटरींनी केलेल्या व्यावसायिक गैरवर्तणुकीबाबतचे परिपत्रक पाहण्यासाठी येते क्लिक करा.

३) दिनांक 25 जानेवारी 2008 नोटरी रजिस्टर व इतर दस्तऐवज जतन करणेबाबतचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

४) दिनांक 03 मार्च 2008 दस्तऐवज नोटरी करताना घ्यावयाची खबरदारी बाबतचे परिपत्रक पाहण्यासाठी येते क्लिक करा.

५) दिनांक 13 एप्रिल 2012 नोटरी फि बाबत लावावयाची नोटीसबाबतचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

६) शासकीय अभियोक्त्यांचे शुल्काबाबतचे शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपण ज्या नोटरीची सेवा घेत आहात त्या नोटरीचे सर्टिफिकेट मुदत संपलेली नाही ना याची खात्री करू शकता, शिवाय सदर नोटरी हे खरे आहेत की, बोगस आहेत याची माहिती घ्या.

आपण  सदर लिंक द्वारे तपासू शकता की, शासनाने नियुक्त केलेले सदर नोटरी आहेत का. 

जर नोटरी बोगस आहे, सर्टिफिकेटची मुदत संपलेली आहे तर आपण त्यांची तक्रार वरील पत्यावर जरूर करा आणि आपल्या सोबत इतर ग्राहकांना, नागरिकांना फसवणुकीपासून वाचवा.

नोटरी ने त्यांना मंजूर केलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे असेही शासनाने नमूद केले आहे. जर त्यांनी त्यांच्या कर्यक्षेत्राबाहेर काम केले तर शासनाकडे तक्रार केल्यावर त्यांचे वर कायदेशीर कारवाई होते आणि त्यांचे सर्टिफिकेट ही काढून घेतले जाऊ शकते.
 
तेव्हा ग्राहकांनी सजग बनले पाहिजे. सरकार सरकार म्हणजे कोण? जनता हीच सरकारची मालक आहे. बिनधास्त पुढे या, सोशल मीडिया चा वापर करा आणि लिहायला, तक्रार लेखी, ईमेल ने द्यायला शिका तरच देश बदलेल.

हे असेच चालायचे आपला देशाची व्यवस्था खूप भ्रष्ट झाली आहे असे रडगाणे गाण्या पेक्षा  आपण ती सुधारूयात. चला व्यवस्था बदलूयात.

मित्रांनो, जागरूक नागरिक होऊन समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, कमी करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यासाठी, वाचन, चिंतन, मनन, सकारात्मक चर्चा आवश्यक आहे.

अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, वेबसाईट या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॉटफॉर्मवर अवश्य फॉलो करा.

Follow us on,

फेसबुक- 

वेबसाईट-

फेसबुक ग्रुप- 

टेलिग्राम- 


फेसबुक पेज -

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीज ग्राहकांचे अधिकार! ग्राहकांनी तक्रार कुठे करावी!

माहितीचा अधिकार कायदा 2005 (RTI-Right to Information Act 2005) म्हणजे काय?